Monday, February 18, 2013

मला भेटलेल्या कविता : 2

रोमानियाचा अत्यंत लाडका contemporary कवि निकिता स्तनेस्कू - 20 व्या शतकातील महत्वाचा कवि !
1933 मधे जन्मला आणि अतिशय लहान वयाचा - दुसर्या महायुद्धात जर्जर झालेल्या रोमानियाचा - अत्यंत संवेदनशील साक्शीदार !
महायुद्धाच्या काळात रोमानियावर झालेल्या हवाई हल्ल्यावरची ही त्याची अतिशय बोलकी कविता -

2. Sfârşit de bombardament

Ai scăpat creta din mână
și ușa bătută în scânduri s-a dat de perete:

cerul s-a arătat, pieziș,
acoperit de paianjeni
care mâncau copiii uciși.

Cineva ți-a dus departe
zidurile
și gutuiul
și scara.

Tu pândeai primăvara
nerăbdător, cum aștepți
o eclipsă de lună.

Către zori ți-au dus departe
și gardul
pe care-l însemnai cu o dungă,

să nu cumva să rătăcească berzele,
când vor veni,
primăvara….


2. एका हवाई हल्ल्याचा शेवट

तू तुझा खडू खाली टाकलास
आणि भग्न दरवाजा भिंतीवर धडकला

आभाळाचा काही भाग झाकोळला होता
कोळ्यांच्या जाळ्यानी.
मुलांच्या खुनांवर पोसलेल्या

कुणीतरी घेऊन गेल होतं
भिंती
फळझाड
आणि जिने .

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास
अधीरपणे ,जशी काही तुला अपेक्षा होती
चंद्र ग्रहणाची .

पहाटेपर्यंत ते घेऊन गेले
कुंपण सुद्धा
ज्यावर तू सही खरडली होतीस ,

करकोचांनी रस्ता चुकू नये म्हणून
पुन्हा परतताना
वसंत ऋतूत .


बाँबस्फोटानंतर इतकं खिळखिळं झालं होतं दार, कि छोट्याशा खडूच्या खाली पडण्याच्या एवढ्याशा आवाजाने सुद्धा ते हललं आणि भिंतीवर आपटलं !

आभाळाकडे पहावं तर बरंचसं आभाळ झाकून गेलंय्, बाँबस्फोटानंतर आभाळात उडालेल्या काळ्या कणांनी....
पण ते कोळ्याच्या जाळ्यासारखे दिसतायत्...जर्मनी आणि रशिया यांच्यामधे महायुद्धाच्या जाळ्यात सापडलेल्या छोट्या रोमानियाची अवस्था कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या माशीसारखी झाली आहे !
अश्राप बालकांप्रमाणे रोमानियन लोकांचे या युद्धात बळी गेले आहेत.

वसंत ऋतूमागे तू शोधत होतास... ..शोधणे इथे hunt शिकार करणे या अर्थाने आलंय्, (pandeai) शिकार ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती. युद्ध संहारानंतर माणुसकी राहिली नाहीय् शिल्लक..सर्वस्व लुटल्या गेलेल्या प्राण्याची अस्तित्वासाठी धडपड फक्त..(basic instinct of an animal for survival)
जशी काही तुला अपेक्षा होती चंद्र ग्रहणाची ..जणू चंद्र ग्रहणानंतर पुन्हा आलेल्या प्रकाशात नवी सृष्टी दृष्टीपथात येणार आहे ! संपूर्ण अंधारानंतर पुन्हा नवी सुरुवात ! हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जग थांबलेलं असतं.. जणू काही मृतवत झालेली सृष्टी वसंतात नव्याने जन्मते ..जणू आता इतक काही वाईट होऊन गेलेलं आहे कि फक्त आणि फक्त चांगलंच होणार हा ईश्वराची संदेश आहे. कारण चंद्रग्रहण रोमानियन संस्कृतीत अशी घटना मानली गेलंय कि त्या माध्यमातून तुम्हाला काही ईश्वरी संदेश मिळत असतो .ज्यानंतर खूप चांगलं घडतं काहीतरी किंवा खूप वाईट..आपणही म्हणतोच की - चंद्रग्रहणानंतर काहीतरी वाईट घडणारेय् किंवा कधी काहीतरी खूप चांगलं..
पण सुरक्षेसाठी असलेलं ..राहिलेलं शेवटचं कुंपण..तेही पहाटेपर्यंत हिरावून घेतलं गेलं होतं ..
घरातल्या – कुटुंबातल्या लोकांच छप्पर तर गेलच ..पण वसंत ऋतूत स्थलांतर करून येणाऱ्या करकोच्यांचं घरटंही ! स्थलांतरित पक्षी पुन्हा पूर्वी बांधलेल्या घरट्यातच राहायला येतात...
...त्यांना घराची खुण म्हणून खरडलेल्या सही सकट कुंपणही युद्धानी लुटलं .... |

No comments:

Post a Comment